सर्वाधिक लोकप्रिय
Zero Hour ABP Majha : नांदेड रुग्णालयातील मृत्यू तांडव, ज... Breaking News : राष्ट्रवादीच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल... Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळ... Rohit Pawar : नांदेडमधील घटनेची जबाबदारी स्वीकारुन तानाजी... शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्याबाबतचा करार संपन्न, ... Nanded Hospital : खासदार पाटील माफी मागा, अन्यथा... ; नां... High Court : माफी मागण्यापेक्षा दिलेली कामं नीट करा; हायक... Ajit Pawar : 'देवगिरी' बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीला ... IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन ... Bachchu Kadu : भाजपकडून मतदारसंघात त्रास, कामापुरतं वापरु... Job Opportunity: नोकरी असावी तर अशी! 83 लाख पगार, एक आठवड... Physics Nobel Prize 2023: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार... World News: गायीचं रक्त का पितात आफ्रिकन लोक? कुटुंबियांच... World : 'येथे' वडीलांच्या मृत्यूनंतर मुलालाही संपवतात, वि... World News: महिलेचे चक्क भूताशी प्रेमसंबंध; 20 वर्षांनंतर...
  • जागतिक
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • खानदेश
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मुंबई
  • जाहिरात
  • इतर
  • एसटी व्ही न्यूज विशे
  • मराठवाडा
  • कृषी
  • व्हिडिओ बातम्या
  • ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Pandemic : कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं स...

मुंबई : जग आता कुठे कोविड-19 (Covid-19) महामारीतून (Pandemic) सावरत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीची (Corona Pandemic) सुरुवात झाली. या महामारीने ...

September 26, 2023

Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...

Covid-19 Treatment Effect: कोरोना झाला, औषध घेतलं अन् बाळ...

Coronavirus : तुमच्या फोनवरही कोविड व्हायरस? मोबाईलमुळे क...

काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कु...

  1. होम
  2. "यत्नाळ'च्या सांडव्यातून जतला कृष्णेचे पाणी; शाश्‍वत पाण्यासाठी आंतरराज्य कराराची गरज
पश्चिम महाराष्ट्र

"यत्नाळ'च्या सांडव्यातून जतला कृष्णेचे पाणी; शाश्‍वत पाण्यासाठी आंतरराज्य कराराची गरज

Aapli Baatmi October 02, 2020

सांगली  कर्नाटकच्या तुबची-बबलेश्‍वर योजनेतून जत तालुक्‍यासाठी पाणी घेण्याचा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. गेल्या जुलै-ऑगस्टमध्ये सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाल्यानंतर या प्रस्तावाची चर्चा सुरू झाली; मात्र “रात गयी… बात गयी’ या उक्तीप्रमाणे या प्रस्तावावर गेल्या दोन महिन्यांत काहीही नवी हालचाल झाली नाही. आता तर जत-कर्नाटक सीमाभागात धो धो पाऊस झाल्याने नैसर्गिक उताराने महाराष्ट्रात कर्नाटकातील यत्नाळ तलावातून तिकुंडी ओढ्यात पाणी वाहत असल्याने हा प्रस्तावच आता त्यातून वाहून जातोय की काय अशी स्थिती आहे. 

सध्या कर्नाटकाच्या जलसंपदा विभागाने महाराष्ट्राच्या कृष्णेतून आलमट्टी धरणाकडे जाणारे पाणी तुबची-बबलेश्‍वर येथून उचलून घेऊन विजापूरच्या संपूर्ण दुष्काळी पट्ट्यातील तलाव पाण्याने भरून घेतले आहेत. यातला शेवटचा तलाव यत्नाळचा, त्यानंतर महाराष्ट्रातील जत तालुक्‍याचा भाग सुरू होतो. बहुतांश तलाव हे नैसर्गिक ओढ्यावर बांधले असल्याने ते सर्व भरले की, पाणी नैसर्गिक उताराने जत तालुक्‍यात येते. तसे मागील वर्षी यत्नाळचा तलाव भरून तिकुंडी-2 तलावामधून पाणी भिवर्गी तलावात गेले. या वर्षी कर्नाटकातील सर्व तलाव पूर्ण भरले व त्यानंतर त्या भागात खूप पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी भिवर्गी तलावात आले. \महाराष्ट्र सरकारने काहीही न करताच नैसर्गिक उतारानेच भिवर्गी तलावाच्या ओढ्यात पाणी आले. 

अजूनही जालिहाळ (बु), गुलगुंजनाळच्या तलावामध्ये पाणी नाही. या तलावांना पाणी कर्नाटकातील शिरनाळ जेथून वाहणाऱ्या मोठ्या कालव्यातून घेता येते. शिरनाळ कालवा ते जालिहाळ (बु) तलाव अंतर केवळ 8 किमी. असून, फक्त 2 किमीचा कॅनॉल महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे. पुढे पाणी नैसर्गिक उतारानेच वाहते. कर्नाटकातील अरकेरी येथील अमोघसिद्ध पादगट्टी येथून केवळ 3 किमीपर्यंत उचलले की, पुढील 8 किमी. नैसर्गिक उताराने या भागातील तिकुंडी-1 तलावही भरून घेता येईल. हे करण्यासाठी कर्नाटक सरकारच्या परवानगीने त्यांच्या कालव्यातून पाणी घेण्याची व्यवस्था करणे, तसेच कर्नाटकातील क्षेत्रातून खोदाई करण्यासाठी आवश्‍यक तो करार करण्याची गरज आहे. याचा खर्च महाराष्ट्र सरकारने केल्यास जत तालुक्‍याचा कायम दुष्काळी व वंचित भागाची शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची शाश्‍वत सोय होईल. 

लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
कर्नाटकला महाराष्ट्राकडून राजापूर बंधाऱ्यातून उन्हाळ्यात पाणी मिळावे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राने ते पाणी देतानाच जतसाठी तुबची-बबलेश्‍वर योजनेतून दोन टीएमसी पाणी परत घ्यावे. वर्षातून त्याची दोन आवर्तने करावीत. त्याचा देखभाल खर्च म्हणून त्या किमतीचे पाणी किंवा रक्कम देण्याचा दोन राज्यांदरम्यान करार व्हावा. हे पाणी तलावांपर्यंत नेण्यासाठी वीस कोटींच्या खर्चाची योजना आम्ही शासनाकडे सादर केली आहे. लोकप्रतिनिधींनी त्यासाठीही पुढाकार घ्यावा. 
– एन. व्ही. देशपांडे, सचिव, येरळा प्रोजेक्‍ट सोसायटी. 

“सकाळ’ची भूमिका 
महाराष्ट्राने कर्नाटकला ऐन उन्हाळ्यात प्रत्येक गरजेच्या काळात शिरोळ तालुक्‍यातील राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे. उन्हाळ्यात तुबची-बबलेश्‍वर योजनेतून महाराष्ट्राच्या पाण्याची गरज असते. 1450 अश्‍वशक्तीचे 13 पंप या योजनेत आहेत. तिकोंटा पंपिंग स्टेशनमधून एक महिना पाणी जत तालुक्‍याला साधारण महिनाभर दिले तर दोन टीएमसी पाणी मिळू शकते. अशी वर्षातून दोन आवर्तने केली तर जत तालुक्‍यातील 42 गावांची सिंचनाची गरज भागू शकते. कमीत कमी खर्चात हे शक्‍य आहे. येरळा व “सकाळ’ने ही भूमिका घेऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा केला आहे; मात्र आजवर म्हैसाळ योजनेचे पाणी येणार, असे सांगत कर्नाटकातून पाणी घेण्याच्या मागणीला बगल दिली जात आहे. यापुढे तरी हा विषय सर्वच लोकप्रतिनिधींनी मनावर घ्यावा. 

संपादन : युवराज यादव

Source From : esakal

ह्याचा प्रसार करा
टॅग :
Aapli Baatmi

तुम्हालाही आवडेल

पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्य...

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य...

शड्डूचा आवाज थांबला; कोरोनामुळे पैलवानांवर रोजंदारीची वेळ

Sangali Lockdown: मिरजेत मद्यविक्री दुकानांबाहेर तळीरामां...

सांगलीत काय सुरु, काय बंद? संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी

पंधरवड्याची भिती: सांगलीत बाजारपेठेत तोबा गर्दी 

जिल्ह्यातील एवढ्या लाख रेशनकार्डधारकांना मोफत धान्य : संच...

''कोरोना रुग्ण नाहीत का? ‘रेमडेसिव्हिर’परत का पाठवली''! 

बलवडीत छावणी मुक्तसाठी चारा प्रकल्प प्रगतीपथावर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर

महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...

दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...

August 15, 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षकप...

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील आक्रमक, हल्लेखोरांना थेट इशारा

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत जिल्हा सो...

फ्रेंड्स ऑफ बीजेपी या अभियानाची आज पुणे विभागात भाजपा प्र...

ताजी बातमी

Zero Hour ABP Majha : नांदेड रुग्णालयातील मृत्यू तांडव, ज...

October 03, 2023

Breaking News : राष्ट्रवादीच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल...

October 03, 2023

Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळ...

October 03, 2023

कोकण

महाविकास आघाडी सरकारच्या फसवणुकीची २ वर्ष : आमदार किसन कथोरे

November 22, 2021

भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीपुरव...

November 13, 2021

आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड बस डेपोत जाऊन एस टी कर्मचाऱ...

November 09, 2021

पश्चिम महाराष्ट्र

पुणे लोकसभा मतदारसंघात "फ्रेंड्स ऑफ बी जे पी" बैठक संपन्न

August 27, 2023

नियंत्रण कक्षातून राहणार नजर; बेळगावात मतदान केंद्रांमध्य...

April 14, 2021

बेळगावात लसीचा पुरेसा साठा; नागरिकांकडून प्रतिसाद, आरोग्य...

April 14, 2021

Aapli Baatmi is the best news website. It provides news from many areas.

आमच्याशी संपर्क साधा : dgmediainfobdl@gmail.com

@2023 - aaplibaatmi.com. All Rights Reserved. Designed and Developed by Newsreach