Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
पालम तालुक्याची निर्मिती होऊन २७ वर्ष लोटले तरीही...?
Aapli Baatmi October 05, 2020

पालम ः तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २७ वर्षाचा कालखंड लोटूनही या कालावधीत सक्षम शैक्षणिक, औद्योगिक प्रकल्प तालुक्याच्या वेशीत कार्यरत झाले नाहीत. पर्यटनाची दुरवस्था झाली आहे. या तालुक्याच्या विकासाला चालना कधी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पालम हा निजामकालीन तालुका म्हणून ओळखला जातो. परंतू, निजाम राजवट संपुष्टात आल्यानंतर पालमचा तालुक्याचा दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतर तालुका दर्जा प्राप्त होण्यासाठी येथील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा देत १९९२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कारकिर्दीत पुन्हा तालुका म्हणून घोषित करण्यात आला. नव्याने झालेल्या तालुक्यामुळे रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लागून विकासाचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही असे वाटले होते. परंतू, पाहिलेले सर्व स्वप्न ‘जैसे थे’ अवस्थेत आजही आहे. शैक्षणिक बाबीचा विचार केल्यास तालुक्यात गणेशराव रोकडे, लक्ष्मणराव गोळेगावकर, सुरेशराव जाधव यांनी शाळा महाविद्यालय सुरू करून शिक्षणाची दालने विद्यार्थ्यांसाठी खुली करीत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. यामुळे तालुक्यात काही प्रमाणात शिक्षण क्षेत्रात वाव मिळाला. परंतू, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते.
हेही वाचा – मध्यवर्ती बॅंकेच्या चोरीस गेलेल्या 23 लाखांचा शोध लागेना- सेलू पोलिसांसमोर आव्हान
जांभुळबेटचे सौंदर्य लयास जाण्याच्या मार्गावर
औद्योगिक क्षेत्राचा विचार केल्यास १९९० मध्ये पेठशिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीच्या माध्यमातून अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या पेठशिवणी परिसरातील नागरिकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटला. या शिवाय तालुक्यात एकही प्रकल्प पुर्ण न झाल्याने मजुर कामासाठी बाहेर गावी स्थलांतरित होत आहेत. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रात वास्तव्यात असलेले जांभुळबेट कधीकाळी पर्यटनाचे आकर्षण बनले होते. परंतू, तेथे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड व बेसुमार वाळू उपश्यामुळे बेटाला आलेले सौंदर्य लयास जाण्याच्या मार्गावर आहे. २००७ मध्ये बेटातील पर्यटनासाठी दहा लाख रुपये खर्च करूनही विश्रामगृह बांधण्यात आले. परंतू, यासाठी याची देखभालीसाठी कोणीच नसल्याने विश्रामगृहातील वस्तू चोरीस गेल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक बाबतीत हा मागास तालुका म्हणून जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहे. या तालुक्याचा विकासाला चालना कधी व केव्हा मिळेल असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आजही भेडसावत आहे.
हेही वाचा – परभणी : हाथरस प्रकरणी कॉंग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग
शहर स्वच्छ, सुंदर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते, नाली, पथदिवे यासह शहरात इतर काही समस्या सोडून शहर स्वच्छ, सुंदर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. या माध्यमातून गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे.
– बाळासाहेब रोकडे, विद्यमान उपनगराध्यक्ष.
संपादन ः राजन मंगरुळकर
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023