Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सहा महिन्याची प्रतीक्षा संपली, रविवारपासून लातूर-मुंबई रेल्वे !
Aapli Baatmi October 08, 2020

लातूर : सहा महिन्यांपासून बंद असलेली लातूर-मुंबई रेल्वे आता रविवारपासून (ता. ११) सुरू होत आहे. आठवड्यातून चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाने नोटीफिकेशनही काढले आहे. ही रेल्वे सुरू होत असल्याने लातूरहून मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाचा पार्श्वभूमीवर मार्चपासून लातूर-मुंबई रेल्वे बंद करण्यात आली होती. सहा महिन्यांपासून ही रेल्वे बंदच होती. केंद्र शासनाने गेल्या महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने पहिल्या टप्प्यात देशात काही लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केल्या जात आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यात आता लातूर-मुंबई ही रेल्वे सुरू होत आहे. ता. ११ आक्टोबरला मुंबईहून ही रेल्वे निघणार आहे. ता. १२ आक्टोबरला येथून ती मुंबईला जाणार आहे. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार असे चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. आतापर्यंत ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस बिदरपर्यंत जात होती. पण, सध्या तरी ती बिदरपर्यंत जाणार नाही. केवळ मुंबई ते लातूर अशी धावणार आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने मुंबई, पुण्याचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यात आता दसरा दिवाळी सण येत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सुरू होत असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023