Nipah Virus : कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरस संसर्गजन्य? तज्...
मुंबई : सध्या भारतात (India) निपाह व्हायरस (Nipah Virus) चा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशात (Nipah Virus In India) केरळमध्ये (Kerala) निपाह व्हायरस...
September 18, 2023
सहकाऱ्याच्या विरहाने मंत्री जयंत पाटील गहिवरले
Aapli Baatmi October 18, 2020

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक लोक मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रमात आज मंत्री जयंत पाटील हे भावूक झाले.
हेही वाचा – मिरज स्थानकाबाहेरील सांडपाणी हटेना; प्रवासी हैराण –
जवळच्या सहकाऱ्याचे अकाली निधन झाल्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला मार्गदर्शन करणारी लोकं जेव्हा अकाली निघून जातात तेव्हा खूप दुःख होती अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
हेही वाचा – Navratri Special : कोरोना काळात ‘त्या’ बनल्या संकटमोचक –
कोरोनामुळे जगभरात अनेकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दुध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जाणत्या लोकांचा या काळात मृत्यू झाला.
कोरोनाचं संकट काळात तसेच जबाबदार सहकाऱ्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेवटी श्रद्धांजली वाहून त्यांनी कातरलेल्या स्वरात बोलणं संपवले. त्यावेळी उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले.
संपादन – स्नेहल कदम
Source From : esakal
टॅग :
तुम्हालाही आवडेल
महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय योगासन स्पर्धे...
दि १५ ऑगस्ट २०२३ प्रतिनिधी, बदलापूर योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघ अंतर्गत महायोगोत्सव- 2023 नागपूर निमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑ...
August 15, 2023